शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

भविष्यात भारताचे युध्द चीन-पाकशी एकाचवेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:14 IST

सांगली : जागतिक पातळीवरील घडामोडी लक्षात घेतल्यास, भविष्यातील भारताचे युध्द चीनशीच असेल आणि त्यावेळी पाकिस्तानशीही लढावे लागेल, असे प्रतिपादन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले.सांगली शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिना ब्रिगेडियर हेमंत महाजन च्या निमित्ताने शनिवारी आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. ‘चीन पुरस्कृत दहशतवाद’ असा व्याख्यानाचा विषय होता. येथील मालू हायस्कूलच्या क्रीडांगणावर ...

सांगली : जागतिक पातळीवरील घडामोडी लक्षात घेतल्यास, भविष्यातील भारताचे युध्द चीनशीच असेल आणि त्यावेळी पाकिस्तानशीही लढावे लागेल, असे प्रतिपादन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले.सांगली शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाब्रिगेडियर हेमंत महाजन च्या निमित्ताने शनिवारी आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. ‘चीन पुरस्कृत दहशतवाद’ असा व्याख्यानाचा विषय होता. येथील मालू हायस्कूलच्या क्रीडांगणावर केशवराव दीक्षित गौरव व्याख्यानमाला सुरू आहे. सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर यावेळी उपस्थित होते.महाजन हणाले की, डोकलामच्या निमित्ताने चीन आणि भारतामध्ये मोठा तणाव निर्माण झाला. चीनबद्दल भीतीचे वातावरणही पसरले; मात्र ते एक मानसिक युध्द होते. ते आपण जिंकले आहे. आपल्याला यापुढेही अशा युध्दांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी आपल्याला अंतर्गत सुरक्षेकडे विशेषत: दहशतवाद व नक्षलवादाकडे गांभीर्याने पाहायला हवे. चीनची युध्दखोरीची प्रवृत्ती कायम आहे. त्यांना भारताला हरवून, जगात आपणच दादा आहोत, हे सिध्द करायचे आहे; मात्र गेल्या नऊ वर्षांत भारताने केलेली तयारी मोठी आहे. बंदरांचा विकास जलदगतीने होत आहे. त्याचवेळी चीनचे शेजारी राष्ट्रांशी असलेले संबंध पाहता, तसेच आपल्याशी त्यांची सुरु असलेली मैत्री पाहता, चीनला भारताविरुध्द युध्द पुकारणे तेवढे सोपे नाही. २०२० मध्ये चीन ते युध्द करेल, असेही जाणकारांचे मत आहे. त्यावेळी पाकिस्तानही आपल्याशी युध्द करेल. त्याची तयारी म्हणून ते पाकिस्तानशी जोडणारा चार हजार किलोमीटरचा महामार्ग बनवत आहेत. मात्र हा रस्ता त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. श्रीलंकेतील त्यांचे बंदर ज्याप्रमाणे आज बंद पडल्यात जमा आहे, तशीच या महामार्गाची अवस्था होईल. आपणही या महामार्गाचा भविष्यात युध्दासाठी वापर करु शकतो. त्याचवेळी पाकिस्तानमधून चीनशी व्यापार झालाच, तर तो दहशतवादाचा होईल. त्यामुळे त्या मार्गाची फारशी भीती बाळगण्याचे कारण नाही. आपल्याला चीनविरुध्द लढायचे आहेच, मात्र त्याचवेळी त्यासाठी जगातील त्यांच्या शत्रुराष्टÑांसोबत आपल्याला मैत्री करावी लागेल, असेही ते म्हणाले.महान कार्याचा ध्यास हवासध्याचे सरकार त्यादिशेने पाऊल टाकत आहे. नुकतेच झालेले आॅस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान या राष्ट्रांबरोबरचे आपले करार त्या रणनीतीचा भाग आहेत. असे मैत्रीसंबंध वाढवून आपण चीनवर दबाव निर्माण करू शकतो. ट्रम्प यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ धोरण आता बदलत आहे. या बदलांचा कानोसा घेऊन आपली धोरणे ठरली पाहिजेत. देश महान होण्यासाठी देशातील नागरिकांनी महान कार्याचा ध्यास घेतला पाहिजे, असेही महाजन म्हणाले.